वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता महाराष्ट्र सरकराकडून सर्व वारकऱ्यांना मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. वारीमध्ये अनेक घटना घडतात. त्यात अनेक वारकरी आपला जीव गमावतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकराने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान हा विमा किती रुपयांपर्यंत मिळणार ? हे आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ.

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण देणारी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यामुळे लाखो वारकऱ्यांना शासनाच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे.

किती मिळणार विमा ?

वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमा संरक्षण लागू असेल. यामध्ये एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तर दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास १ लाख रुपये देण्यात येतील.

याशिवाय अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये तसेच वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ हजार रुपयापर्यंतचा खर्च मिळेल. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *